उस्मानाबाद येथे सुनील ढेपे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्हयातील उदगीर येथील पत्रकार विनोद उगले यांच्या घरावर काल रात्री हल्ला केला गेला.त्यांच्या घरावर दगडफेक केली गेली आणि दाराची मोडतोड करण्यात आली.हल्लेखोरांनी त्यांच्या घराचे मेन गेटही तोडून टाकले आहे.तेथे उभे राहून त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली गेली आणि धमक्याही दिल्या गेल्या.एवढं सारं झाल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे.बातमीच्या रागातून हे सारं घडलं असल्याचे समजतेय.-
(Visited 203 time, 1 visit today)